Grapes Loss by Rain and Adverse Weather
sakal
नारायणगाव - अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना अपेक्षित घड निर्मिती न झाल्याने यंदाचे वर्ष जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना आर्थिक अडचणीचे ठरले आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.तालुक्यातील द्राक्ष तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.