

Harshvardhan Sapkal Criticizes BJP’s Divisive Election Strategy
पुणे : भाजपचे नेते इमारतींचा पुनर्विकास, टक्केवारी यातच गुंतले आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे विचार बाजूला सारले आहेत. स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवण्याऐवजी भाजप खान की बाण, उर्दू की मराठी, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र अशा विभाजनवादी प्रश्नांवर निवडणूक लढवीत आहे. पैसा फेको आणि तमाशा देखो अशी स्थिती भाजपची झाली’’ अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.