

"आता आश्वासन नाही, मदत हवी!" महसूल विभागाच्या लेखी पत्रानंतर लोणी काळभोरमधील आमरण उपोषण मागे.
Sakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत सकारात्मक भूमिका मांडली आणि आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
फोटो - माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांना लेखी आश्वासन देताना नायब तहसीलदार मयुर बनसोडे