महाविद्यालयाच्या परीक्षा होणारच;उच्चतंत्र शिक्षण  मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

uday samant
uday samant
Updated on

पुणे - महाविद्यालयांच्या परीक्षा होणारच आहेत, त्या रद्द केल्या जाणार नाहीत असे स्पष्टीकरण राज्याचे उच्च न तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका व्हिडिओ द्वारे दिले आहे. 

शिक्षण विभागाने इयत्ता ९वी आणि ११वीची परीक्षा रद्द केली. तसेच १०वीचा भूगोलाचा पेपरही रद्द केला. यामुळे याता पदवीच्या परीक्षा ही रद्द केल्या जाणार आहेत  अशा वावड्या उठल्या होत्या. 

याबाबत उदय सामंत यांनी सोमवारी एका व्हिडिओ द्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले.  सामंत म्हणाले, " शालेय शिक्षण विभागाने इयत्ता ९वी, ११वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाविद्यालय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयीन परीक्षांसंदर्भात समितीस स्थापना केली आहे. त्यात चार विद्यापीठांचे कुलगुरु असून ते आपला अहवाल राज्यपालांना देणार आहे. त्यामध्ये महाविद्यालयीन परीक्षा कशी घ्यावी, कधी घ्यावी यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत  परीक्षा घेतली जाणार आहे. शिवाय आणीबाणीची परस्थिती निर्माण झाली तर परीक्षा कशी घ्यावी याचा ही विचार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com