
प्रसाद कानडे
पुणे : माहिती तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रासाठी ओळखला जाणारा हिंजवडी परिसर सध्या गंभीर अशा वाहतूक कोंडीच्या कचाट्यात अडकला आहे. वाहतूक कोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्यानंतर आता स्थानिक प्रशासनदेखील कामाला लागले आहे. पीएमपी प्रशासनाने नुकतेच या भागाचे सर्वेक्षण करून, बालेवाडी येथील आगाराजवळील सुमारे १० एकर जागा व वाकड जकात नाक्याची काही जागा ‘ट्रान्झिट हब’साठी उपलब्ध करून देण्यास पीएमपी प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. तसा प्रस्तावदेखील विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. या ठिकाणी जड व मोठ्या वाहनांचे पार्किंग होणार आहे.