
पुणे : "समाजाला ज्ञान, न्याय आणि विवेकाचा मार्ग दाखवणे हा प्रवचनकाराचा हेतू असतो. आपल्या परंपरेत सगळ्या गोष्टींची व्याख्या केलेली आहे. मात्र असे असूनही संतांची आणि परंपरेची वाट चुकीची आहे, असे सांगणारे लोक पुरोगामीत्वाचा खोटा मुखवटा धारण करून आत्मवंचना करतात. समाजाचे प्रबोधन करणे म्हणजे परंपरा नाकारणे नव्हे," असे मत व्याख्याते डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.