पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) कायद्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकासआघाडी सरकारनेही कायदा लागू करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पुण्यातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पवार यांनी राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी, 'महाराष्ट्रामध्ये एनआरसी लागू करायचा की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. पण आमची भूमिका एकच आहे. महाराष्ट्रात कुणालाही एनआरसी, सीएएचा त्रास होऊ देणार नाही असं सगळ्यांचं मत आहे', अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिला.
भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने एनआयएकडे तपास सोपवला आहे. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे, असंही अजित पवार म्हणाले.
तसंच, आधीपासून सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना सुरू ठेवणार आहे. राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे. आणखी कर्ज काढता येऊ शकतं का? त्याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या बजेटनुसार किती पैसे येतात ते पहाव लागेल, असंही अजित पवार म्हणाले.
पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.