सौद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ

Farmer
Farmer

पिंपरी - शेतीमालाचे बाजार आवाराबाहेरील नियमन रद्द केल्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. वजनकाटा न करता शेतकऱ्यांकडून उक्‍त पद्धतीने पडत्या किमतीत शेतमाल खरेदी केली जात आहे. बाजाराच्या आवाराबाहेरील व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उरले नसल्याने त्यावर कारवाई करणेही कृषी उत्पन्न बाजार समितीला अशक्‍य झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या पिंपरी उपबाजारामध्ये हवेली तालुक्‍यातील कोलवडी गावचे शेतकरी सत्यवान जोरे यांच्याबाबत अशी फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बाजार आवाराबाहेरील व्यवहार नियमनमुक्त झाले आहेत. बाजार आवारातील लिलाव, सौदा नोंद किंवा हिशोबपट्टी तयार करण्याची पद्धत तेथे लागू होत नाही. त्याचाच गैरफायदा घेत पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्याने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.      

जोरे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी पिंपरी उपबाजारातील एका व्यापाऱ्याने माझ्या शेतावर येऊन अडीच लाख रुपयांचा फ्लॉवरचा माल खरेदी केला; परंतु, कोणत्याही प्रकारची हिशेबपट्टी नसल्याने व्यापारी १८ महिन्यांपासून पूर्ण पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्याच्याकडे सध्या ४७ हजार रुपये शिल्लक राहिले आहेत. माझ्यासह आणखी काही शेतकऱ्यांचे पैसे त्याच्याकडे थकीत आहेत. त्याबाबत मी बाजार समितीकडे तक्रार दिली आहे.’’

शेतातील बांधावरच्या शेतमाल खरेदीमध्ये फसवणूक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत; परंतु, आम्हाला केवळ बाजार आवारातील तक्रारींवर कारवाई करता येते; परंतु, बाजार आवाराबाहेरील क्षेत्र नियमन मुक्त झाल्याने तेथे बाजार समितीला  कारवाई करण्याचे अधिकार नाहीत.
- राजू शिंदे, प्रमुख, पिंपरी उपबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com