
पुणे : यंदा देशात तांदळाचे विक्रमी १२ कोटी टन उत्पादन निघाले आहे. तसेच, उन्हाळी पीक जर यामध्ये जोडले, तर साधारण १३ कोटी ६४ लाख टन यावर्षी देशाचे उत्पादन झाले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
देशात तांदळाच्या उत्पादनात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी जून २०२४ पासून टप्प्याटप्प्याने उठविण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये शेला बासमती प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीस मंजुरी देण्यात आली. त्यानंतर व्हाइट बिगर बासमती तांदळाचीही निर्यात सुरू करण्यात आल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.