

Police, municipal officials and disaster response teams are managing accommodation for nearly 80,000 Warkaris in Alandi.
Sakal
आळंदी : इंद्रायणी नदीला पूर आल्याने वारकऱ्यांची काहीशी गैरसोय झाली आहे. मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना निवारा आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आळंदीतील सार्वजनिक मंडळ, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन सरसावले आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या पुरात अडकलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. आज दिवसभरात 70-80 हजार वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत.