‘परिवर्तनाशिवाय मुलींचा जन्मदर वाढणे अशक्‍य’

‘परिवर्तनाशिवाय मुलींचा जन्मदर वाढणे अशक्‍य’

पुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे म्हणत फक्त स्त्रियांचे प्रबोधन न करता पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांच्या वर्तनाचे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत मुलींच्या जन्माचे दर वाढणार नाहीत, असे प्रतिपादन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. 

परिवर्तन महिला आधार केंद्राच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना ‘जिजाऊ- सावित्रीच्या लेकी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. फडके बोलत होते.

‘बेटी बचाओ’ चळवळीचे प्रणेते डॉ. गणेश राख, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारुती तुपे, स्वाती टेळे, उत्तम कामठे, रमजान शेख, संजय सातव, जीवन जाधव, सतीश भिसे, मसूद शेख, रतन माळी, सुधाकर राजे, प्रमोद परदेशी, स्वप्नील क्षीरसागर, सविता हिंगणे, अनुप गौड आदी उपस्थित होते.

राधा बोरोळे, सविता राजिवडे, आशा त्रिभुवन, शोभा जाधव, गौरी सूर्यवंशी, वर्षा ननावरे आदी कर्तृत्ववान महिलांचा ‘जिजाऊ- सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. फडके म्हणाले की, ‘पुणे तिथे, काय उणे’ असे म्हणत महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा वसा आणि वारसा देण्याचे काम पुणे जिल्ह्याने केले आहे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वांत कमी आहे, परंतु पुणे जिल्हासुद्धा त्याला अपवाद नाही. जिजाऊ- सावित्री यांचा वारसा सांगत असताना जगाला दृष्टी आणि सृष्टी देण्याचे कामसुद्धा स्त्रीशक्तीने केले आहे, त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तनाच्या संस्थापक शोभा  लगड यांनी, तर सूत्रसंचालन महेश टेळे व सुजाता गायकवाड यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com