
पुणे : ‘‘सध्या मतचोरीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी फिरत आहेत. मात्र, त्यांनी आधी काँग्रेसची यंत्रणा सुधारण्यासाठी काम करावे. बूथ पातळीवरील यंत्रणा संपुष्टात आली आहे. पक्ष नेस्तनाबूत झाल्यावर दुसऱ्याला दोष द्यायला नको,’’ अशी टीका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असेही गोरे यांनी सांगितले.