

Pune
esakal
कात्रज: कात्रज घाट परिसरात जैववैद्यकीय व इतर घनकचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे पर्यावरण आणि जैवविविधतेसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत दोन दिवसीय विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे ५० ते ५५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मात्र, कात्रज घाटातील कचऱ्याच्या समस्येची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.