

Pune Traffic
sakal
मुंढवा : केशवनगरमध्ये वाढती वाहन संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढणे, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण आणि मानसिक तणाव यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले असून, वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत.