

Pune
esakal
दावडी: खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खरपूडी बुद्रुक (ता.खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने पाण्याचा मोठा साठा झाला. परिणामी बंधाऱ्यालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले असून एका शेतकऱ्याचे शेत अक्षरशः वाहून गेले आहे. यामुळे ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.