पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर यंदा टॅंकरमुक्त

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी दौंड, मावळ व मुळशी या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य दहा तालुक्यांमधील ५९ गावे आणि ३०२ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
Water Tanker
Water TankerSakal
Summary

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी दौंड, मावळ व मुळशी या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य दहा तालुक्यांमधील ५९ गावे आणि ३०२ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

पुणे - पुणे विभागातील कोल्हापूर आणि सोलापूर हे दोन जिल्हे यंदाच्या उन्हाळ्यात टॅंकरमुक्त झाले आहेत. यंदाचा उन्हाळा सुरू झाल्यापासून आजअखेरपर्यंत (ता.६) या दोन जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी एकही टॅंकर सुरु झालेला नाही. दरम्यान, सद्यःस्थितीत विभागातील ७७ गावे ३४० वाड्यांना ७९ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या सुरु असलेल्या एकूण टॅंकर्सपैकी सर्वाधिक ६६ टॅंकर पुणे जिल्ह्यात सुरु आहेत.

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी दौंड, मावळ व मुळशी या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य दहा तालुक्यांमधील ५९ गावे आणि ३०२ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दौंड, मावळ आणि मुळशी हे तीन तालुके मात्र सध्या तरी टॅंकरमुक्त आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही आंबेगाव तालुक्याला बसली आहे. या तालुक्यातील २३ गावे आणि ८८ वाड्यांना २० टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

सद्यःस्थितीत पुणे विभागातील १ लाख ३१ हजार २२० इतकी लोकसंख्या ही पाण्याअभावी तहानलेली आहे. या सर्व लोकसंख्येला टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हे सर्व टॅंकर पुणे, सांगली आणि सातारा या तीनच जिल्ह्यात सुरु आहेत. विभागात सुरु असलेल्या एकूण टॅंकरमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ६६ टॅंकरबरोबरच सातारा जिल्ह्यातील ११ आणि सांगली जिल्ह्यातील २ टॅंकरचा समावेश आहे. विभागातील एकूण टॅंकरपैकी २१ सरकारी आणि ५८ खासगी टॅंकर आहेत. या गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ८९ खासगी, विहीरी व विंधनविहिरींचे अधिगृहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

पुण्यातील तीन तालुक्यांत शून्य टॅंकर

दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांत एकही टॅंकर सुरु झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके सध्या तरी टँकरमुक्त तालुके म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या तीन तालुक्यात दौंड, मावळ आणि मुळशी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com