Kukadi Project
sakal
नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून मागील महिनाभरापासून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा पातळी खालावली आहे. प्रकल्पात आजअखेर ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेले आवर्तन १० एप्रिल रोजी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.