कोंढवा - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी या गावांसह खडीमशीन चौक आणि येवलेवाडी परिसरातील नागरिकांना अद्यापही मूलभूत नागरी सुविध मिळत नाहीत. या सुविधांचा मोठ्या प्रमाणांवर अभाव आहे..पालिकेत समावेश होऊन जवळपास चार वर्षे उलटून गेल्यानंतरही रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.या गावांमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढले असून, अनेक मोठ्या गृहसंकुलांचे बांधकाम झाले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे..उंड्री, पिसोळी आणि हांडेवाडी परिसरात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने नागरिकांना वाहने चालविताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचा अभाव आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे..पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात कोट्यवधींचा निधी गावांसाठी जाहीर केला जाताना दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची परिस्थिती आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा मिळकतकर वसूल केला जात असतानाही, नागरिकांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत..टप्याटप्याने समाविष्ट झालेल्या एकूण ३४ गावांमधील पायाभूत सुविधांसाठी महापालिकेने समाविष्ट गावांतील समस्या सोडवण्यासाठी उपायुक्तांसह २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. तसेच, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, या समित्या गठीत करूनही नागरिकांचे प्रश्न 'जैसे थे' असल्याचे नागरिक सांगत आहेत..प्रतिक्रियामहापालिकेत समाविष्ट गावांतील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात. महापालिका आमच्याकडून कर वसूल करते. मात्र, त्याच्या बदल्यात आवश्यक सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन, पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.- रोहन सुरवसे-पाटील, स्थानिक नागरिक.समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या निविदा काढण्याचे आणि नवीन सोयीसुविधा पुरविण्याचे काम पालिकेच्या मुख्य खात्यांकडून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत देखभाल दुरुस्तीची कामे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात येत आहेत.त्यासंदर्भात काही तक्रार असल्यास नागरिकांनी संपर्क केल्यास अडचणी सोडविण्यात येतील.- राजेश कादबाने, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.