
पुणे : कोथरूड, बाणेर, बावधन या परिसरातील अनेक रस्त्यांचे भूसंपादन होत नसल्याने रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे किंवा बॉटलनेक होत असल्याने कोंडी होत आहे. यातून सुटका करण्यासाठी सक्तीचे सक्तीच्या भूसंपादन केले जाणार आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आले आहे अशी माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत देण्यात आली.