
पुणे - ‘आपण कोणाची बाजू मांडत आहोत, हे समजून घेऊन अभ्यास करून बाजू मांडली पाहिजे. वकिलीमध्ये यशस्वी होण्याचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही. मात्र, कायद्याचे मूळ आणि त्याची योग्य उकल समजून घेतली, तर वकिली क्षेत्रात यश मिळवता येऊ शकते,’’ असे मत राज्यसभा सदस्य ॲड. कपिल सिब्बल यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमाले’अंतर्गत ‘वकिली कौशल्य’ या विषयावर सिब्बल यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘वकिली करताना मानवी भावनांचे कंगोरे वकिलाला समजून घेता आले पाहिजेत; तरच तो आपला मुद्दा न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकतो. पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती व कसा वापरायचा याचे पक्के सूत्र ठरलेले नाही, हेच वकिली क्षेत्रालाही लागू होते. वकिली करताना वकिलांना कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मितीस तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या, हे समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला तरी प्रत्येक खटल्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यांमागील मानवी भावना नेमकी काय होती, हे वकिलाला मांडता यायला हवे.’’
या वेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार आणि कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.