

Need for Rapid Decision-Making and Tech Integration in Modern Warfare
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : ‘‘आधुनिक युद्धात परिस्थितीचा विचार करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. काही मिलिसेकंदांत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लागते. यासाठी भारतीय लष्करात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ५-जी, ६-जी आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जात आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली माहिती आणि प्रणाली स्वदेशी असावी, यावर लष्कराचा भर आहे,’’ असे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख (माहिती प्रणाली आणि तंत्रज्ञान) लेफ्टनंट जनरल विपुल सिंघल यांनी केले.