

लोणी काळभोर येथे ग्रामसभेत बोलताना ग्रामस्थ.
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : एमआयटीने ओढ्यावर केलेले ९ मिटर अतिक्रमण व नदीकडे जाणा-या रस्त्यावर केलेले अतिक्रमण, पीएमआरडीने तात्काळ काढून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा असा ठराव लोणी काळभोर ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.आज सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष ग्रामसभेत वरील ठरावासह,शासनाने गट क्रमांक ३९ मध्ये लोणी काळभोर व अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर गावाला जोडणारा नकाशातील रस्ता मोकळा करून द्यावा.एमआयटी संस्थेने शासकीय परवानगी शिवाय मुळा-मुठा नदीत बांधलेला विश्वराज बंधारा काढून टाकावा हे ठराव सर्वानुमते संमत केले.तसेच पाटबंधारे खात्याच्या वतीने ग्रामपंचायतीला चुकीची नोटीस बजावली याबद्दल निषेध करण्यात आला.