Maharashtra Agriculture: पुणे, मुंबई, नागपूरसह सात बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय नामांकित बाजारतळा’चा दर्जा

APMC Reforms: राज्यातील सात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय दर्जा’ देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
Maharashtra Agriculture
Maharashtra Agriculturesakal
Updated on

मार्केट यार्ड : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार असून, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई, पुणे, लातूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर या सात प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com