

Viral Video Maharashtra Heavy Rain Triggers Dam Water Release After 124 Circles Receive Extreme Rainfall
sakal
पुणे: राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. गेल्या दोन ते तीन दिवसांत घाटमाथा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. राज्यातील १२४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, अनेक धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.