
पुणे : विधिमंडळाच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायद्यासह संघटित गुन्हेगारीविरुद्ध कायदा, ऊसतोड महिला कामगार, खनिकर्म मंडळ, नगररचना संबंधीची चांगली विधेयके मंजूर करण्यात आली. विशेषतः कुंभमेळ्यासाठी सरकार किती सूक्ष्म नियोजन करत आहे, यासंबंधीही अधिवेशनात चर्चा झाली. आता आमदारांनी संबंधित विधेयक नेमके काय आहे, याचा अभ्यास करून ते नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे, हे सांगण्याची गरज आहे, असे मत विधान परिषदे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.