
Bumper Rabi Season Predicted: Maharashtra's Sowing Area to Hit 65 Lakh Hectares.
Sakal
पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, यंदाचा रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. धरणं आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची टंचाई जाणवणार नाही, त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.