महाविकास आघाडीने सहा महिन्यापासून विकासकामे थांबविली - चंद्रकांत पाटील

भाजपने मागिल पाच वर्षांत पालिकेच्या माध्यमातून प्रचंड कामे केली आहेत, विरोधकांना टीका करण्यासाठी संधी ठेवली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभाग रचनेची तोडफोड करण्याचा प्रकार केला.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Summary

भाजपने मागिल पाच वर्षांत पालिकेच्या माध्यमातून प्रचंड कामे केली आहेत, विरोधकांना टीका करण्यासाठी संधी ठेवली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभाग रचनेची तोडफोड करण्याचा प्रकार केला.

उंड्री - भाजपने (BJP) मागिल पाच वर्षांत पालिकेच्या (Municipal) माध्यमातून प्रचंड कामे (Work) केली आहेत, विरोधकांना टीका करण्यासाठी संधी ठेवली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी प्रभाग रचनेची (Ward Structure) तोडफोड (Damage) करण्याचा प्रकार केला. मागिल सहा महिन्यांपासून विकासकामे थांबविल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. दरम्यान, २० एप्रिल ते १० मे दरम्यान महापालिका निवडणूका होतील, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

उंड्री (ता. हवेली) येथील भाजपचे राजेंद्र भिंताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, जालिंदर कामठे, नगरसेविका रंजना टिळेकर, योगगुरू गुरुदेव दिपक, नगरसेवक संजय घुले, राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, अश्विनी पोकळे, मनिषा कदम, माजी नगरसेविका विजया वाडकर, दादासो कड, अविनाश टकले, ओंकार होले, हनुमंत घुले, पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrakant Patil
आरक्षणामुळेच महिलांना स्वतःच्या कतृत्वाचा ठसा उमठविता आला - शरद पवार

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जनसंपर्क कार्यालय न राहता ते आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या अनेकविध योजनांची माहिती नागरिकांना येथे मिळाली पाहिेजे. निवडणुकांना वेळ का तर ५ वर्षांत भाजपने काम केली आहेत. विरोधकांना टीका करण्याची संधीच ठेवली नाही, त्यामुळे प्रभागाची मोडतोड केली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. काल दादांना जाब विचारला तर, त्यांनी वेळ मारून नेली, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली.

प्रास्ताविकामध्ये राजेंद्र भिंताडे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी २० वर्षांपासून विकास थांबविला आहे. सत्तेमध्ये नसतानासुद्धा सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीमध्ये मजूर, कष्टकऱ्यांना मदतीचा हात दिला. शाळांमध्ये २० टक्के शुल्क माफी मिळवून दिली, पूरग्रस्तांना शासनाकडून पाच हजार रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर आणि जालिंदर कामठे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र भिंताडे यांनी केले.

भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून होतेय दमदाटी

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून धमकावले जात आहे. आमच्या पक्षात प्रवेश करा म्हणून दमदाटी होतेय, मात्र मी इशारा देतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना की कालचक्र सुरु आहे. 'आज तुम्ही वर आम्ही खाली आहोत; फार काळ राहीला नाही, जेव्हा आम्ही वर जाऊ, केंद्रात सत्ता आहेच आमची..' असही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com