इंदापूर - इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा छडा लावत इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली असून केवळ एका गुन्ह्याची उकल करताना एकूण 22 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत..या टोळीने मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी, सोलर प्लेटा तसेच शेळ्या-बोकड चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यामध्ये एका अल्पवयीनसह दोघांना अटक करण्यात आली असून अन्य तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत..याबाबत अधिक माहिती अशी की,10 जुलै 2025 रोजी मध्यरात्री वडापुरी येथील वरकुटे खुर्द रोडवरून जात असताना बद्रीनाथ रामु राठोड (रा.भगवान बाबानगर, रुई, ता. बारामती) यांना अज्ञात दोघांनी अडवून, चाकूचा धाक दाखवत मारहाण केली होती आणि त्यांच्याकडील मोबाइल, मोटारसायकल, ट्रकची बॅटरी आणि रोख रक्कम 2 हजार रुपये असा एकूण 28 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता..या प्रकरणी गुन्हा दाखल करीत तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्यासह हवालदार सलमान खान, पोलिस अमलदार गणेश डेरे, अंकुश माने, तुषार चव्हाण, सुरज गुंजाळ, विनोद लोखंडे, नंदू जाधव, योगेश कर्चे, दिनेश चोरमले यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून खंडू उर्फ राहुल अशोक महाजन (वय-19 वर्षे, रा. वडापुरी, ता. इंदापूर) व एक विधी संघर्षित बालक अशा दोघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून संपूर्ण 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..तसेच अधिक तपास केला असता वरील आरोपींनी सचिन अरुण कांबळे (रा. वरकुटे खुर्द), साहिल विलास चौधरी (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) रोहित दत्तात्रय कटाळे (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) यांच्या मदतीने मागील 2 वर्षांत इंदापूर तालुका व आसपासच्या भागात एकूण 22 गुन्हे केल्याची कबुली दिली.यामध्ये शेतकऱ्यांच्या विहीरीवरील पाण्याच्या मोटारी (13 गुन्हे), सोलर प्लेटा चोरणे (3 गुन्हे) तसेच शेळ्या व बोकडे (5 गुन्हे) चोरल्याची कबुली दिली..याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले, पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश असून ही टोळी नेमकेपणाने ग्रामीण भागातील निर्जन शेतात जाऊन चोरी करत होती. विशेषतः गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक हानीला कारणीभूत ठरली होती.त्यांचा बंदोबस्त करण्यात यश आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.