

Pune
esakal
सोमाटणे: गेल्या आठवडाभर झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसानंतर शुक्रवारी (ता. १०) पावसाने उघडीप दिल्याने पवनमावळातील भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, परिसरातील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे.