Maratha Reservation Sakal
पुणे
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला अंतिम लढ्यासाठी पुन्हा मुंबई मोर्चा : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : २९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी वीसपट ताकदीनिशी पुन्हा मुंबई मोर्चा काढण्यात येणार असून, ही अंतिम लढाई सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शिरूर : मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असून, येत्या २९ ऑगस्टला परत मुंबईवर धडक मारणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे सांगितले. मागील वेळी जेवढ्या संख्येने गेलो होतो त्याच्या वीसपट संख्या यावेळी असेल असा निर्धारही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

