Narayangaon flood damage: पुरामुळे मीना नदीवरील नेवकर पुलाची दुरावस्था; शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी गैरसोय, नवीन उंच व रुंद पुलाची तातडीची मागणी

पुरामुळे मीना नदीवरील नेवकर पुलाचे लोखंडी कठडे, संरक्षक जाळ्या व स्लॅबला तडे; पुल बंद झाल्याने नारायणगाव-वारूळवाडीतील शालेय विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय
The Narayangaon–Warulwadi bridge has been closed after severe flood damage, causing inconvenience to students and local residents.

The Narayangaon–Warulwadi bridge has been closed after severe flood damage, causing inconvenience to students and local residents.

Sakal

Updated on

नारायणगाव : पुराच्या पाण्यामुळे नारायणगाव - वारूळवाडी या गावांना जोडणाऱ्या मीना नदीवरील नेवकर पुलाचे लोखंडी खांब असलेले कठडे, संरक्षक जाळ्या तुटून मोठे नुकसान झाले. पुलाच्या स्लॅब ला सुद्धा तडे गेले आहेत. पुल रहदारीसाठी बंद ठेवला आहे.या मुळे शालेय विद्यार्थी व दोन्ही गावातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. नारायणगाव व वारूळवाडी या दोन्ही गावातील वाढलेल्या लोक संख्येचा विचार करता नेवकर पुलाची उंची व रुंदी वाढवून नवीन पुल तयार करावा. अशी मागणी शालेय विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com