पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - इंजिन
- वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी
- शहराचे नेटके नियोजन करून सुनियोजीत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन
- झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे मालकी हक्काचे घर
- प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे संतुलन राखणे, टेंकड्या अतिक्रमणमुक्त करणे
नगर नियोजनात महापालिका सातत्याने कमी पडत आली आहे. त्यामुळेच शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नाही. तर, झोपडपट्टीधारकांच्या समस्या कायम आहेत. तसेच शहरातील वाढते प्रदूषण ही देखील वाहतुकीप्रमाणेच गंभीर झाली आहे, असे बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.