MPSC Update : एमपीएससीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू; उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत

Online Verification : एमपीएससीने स्पर्धा परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी २५ जुलैपासून 'ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
MPSC Update
MPSC UpdateSakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अखेर सुरू केली आहे. आयोगाने यासंदर्भातील सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करत २५ जुलै २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली ओळख पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com