

जळीत ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना धिर देताना आमदार मांडेकर व इतर मान्यवर
Sakal
कोळवण : बुधवार( ता. ८) हा दिवस मुळशी तालुक्यातील भालगुडी गावातील लव्हाळवाडी ग्रामस्थांसाठी काळा दिवस ठरला. आठ घरांना लागलेली भीषण आगीने आठ कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत. वर्षभरासाठी साठविलेले अन्नधान्य सह घरातील सर्व वस्तू डोळ्यासमोर जळून खाक झालेले आहे. उभे आहेत त्या फक्त पडलेल्या भग्न भिंती.... या घटनेने वाडीत भयान शांतता पसरली आहे. कोणी कोणाला धिर द्यायचा हेच समजत नाही अशी स्थिती झालेली आहे.