पुणे - महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मात्र, त्यात नेत्यांमध्ये नावांवरून एकमत होऊ शकले नाही..पक्षातील जुन्या निष्ठावंतांना उमेदवारी देण्याऐवजी नेत्यांच्या मर्जीतील लोकांनाच नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहे का, पुण्यात बैठका घेताना संसदीय मंडळातील सदस्यांना बोलावले नाही, कार्यक्षम आणि सर्वेक्षणात नाव असूनही उमेदवारी का कापली जाते? असे प्रश्न विचारले. त्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार चर्चा झाली. वादाचे मुद्दे व एकमत न झालेल्या नावांवर पुढे निर्णय घेऊ, असे सांगून फडणवीस यांनी चर्चा पूर्ण केली..पुण्यात भाजप उमेदवार ठरवण्यासाठी मतदारसंघनिहाय आमदार आणि माजी आमदारांबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून नावे अंतिम करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर शुक्रवारी (ता. २६) पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार होती..मात्र, उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केल्याने व आमदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने शुक्रवारी यादी जाहीर करण्याचे भाजपने टाळले आहे. पक्षासाठी २० ते ३० वर्षे काम करणाऱ्या जुन्या लोकांना संधी द्या, शिवसेनेबरोबरची युती, बाहेरच्या पक्षातून आलेले माजी नगरसेवकांमुळे आधीच जागा कमी झालेल्या असताना लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना उमेदवारी द्यावी, त्यासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गेल्या पाच वर्षांत चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांची उमेदवारी नाकारली जाणार होती, हा मुद्दा बैठकीत आल्याने प्रयत्न हाणून पाडला..बैठकीत आमदारांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या नसल्या, तरी त्यांच्या काही जागांबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. बैठकीत सुमारे ८० ते ९० जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित जागांवर मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले..‘वादग्रस्त लोकांना उमेदवारी नको’काही उमेदवार महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाणार असेल, तर मतदारांमध्ये पक्षाबद्दल नकारात्मक प्रचार होऊ शकतो. त्यामुळे अशा कलंकित लोकांना उमेदवारी देऊ नये. तेथे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, अशी मागणी महिला लोकप्रतिनिधींनी केली. त्यास अन्य आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही..पुण्यात बुधवारी एका हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदारांबरोबर वैयक्तिक चर्चा केली, तेथेही काही जणांची नावे उमेदवार म्हणून घेतली नाहीत. हे निरोप लगेच संबंधित लोकांना कसे पोचत होते? असा प्रश्न एका आमदारांनी उपस्थित केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.