

The Shri Chaitanya Maharaj Palkhi departed from Otur for Pandharpur amid heavy rain and devotional chants.
Sakal
पराग जगताप
ओतूर : मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "रामकृष्ण हरी"च्या अखंड जयघोषात तसेच टाळ-मृदुंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे सोमवारी (ता.६) दुपारी ओतूर येथील संजीवन समाधीस्थळावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.