अपघात, नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूलाची आवश्यकता

Flyover
Flyover
Updated on

पुणे - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथील मांजरी फाटा (१५ नंबर) ते उरुळी कांचनदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. परिणामी, महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये प्रचंड कोंडी होते. तसेच, रस्त्याच्या कडेलाच विविध विक्रेते बसतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी व गावांतील नागरिक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावरील जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसरपाठोपाठ हवेली तालुक्यातील या भागांमध्ये विविध आस्थापने, खासगी कंपन्या, सुसज्ज दवाखाने, मोठी दुकाने, शोरूम, मॉल व शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली आहेत. शहराच्या लगतचा भाग असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीनुसार शेवाळवाडीपर्यंतचा भाग पालिकेत समाविष्ट केला आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी पुणे शहर व परिसरातील अनेक भागांतील नागरिकांना या रस्त्याने जाणे सोयीचे ठरणार आहे. या रस्त्याचा नुकताच सर्व्हे झाला असून त्याचे ब्लॉक एस्टिमेट तयार करून ते भारतीय राजमार्ग विकास प्राधिकरणाकडे पाठविल्याचे प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी सांगितले.

आमचे गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरले असल्याने दिवसभर विविध कारणांसाठी रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथेच ऑईल डेपो असून, यामध्ये जाणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांची वर्दळ दिवसभर सुरू असते. वाहतूक करणाऱ्या गाड्या आकाराने मोठ्या असल्याने मुख्य रस्त्यावर होणाऱ्या कोंडीत भर पडते; तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका संभवतो. यासाठी उड्डाणपूल होणे सोयीचे आहे, असे कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी सांगितले.

मांजरी परिसरामध्ये उड्डाणपूल नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नोकरदारांना सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
- आदित्य काळे, रहिवासी, मांजरी

लोणी काळभोर, उरुळी कांचन ही गावे ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित झाल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरामध्ये मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडी होते. उसाचा हंगाम चालू असतो, त्या काळात कोंडीत भर पडते. यासाठी उड्डाणपूल व्हावेत.
- संतोष कांचन, सरपंच, उरुळी कांचन

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com