
पिंपरी - गेल्या काही वर्षांत शंभर टक्के निकालाची क्रेझ वाढल्याने नववीत नापास करण्याचा नवा फंडा शहरातील नामांकित शाळांनी सुरू केला आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द करावा, तसेच बाहेरून १७ नंबरचा फार्म भरावा, असा दबाव नामवंत प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या शाळांकडून आणला जात आहे, अशा तक्रारी काही पालकांनी ‘सकाळ’कडे केल्या आहेत. मात्र, याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांना नववीत परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे दहावीच्या निकालावर परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांना नववीतच नापास करण्याची पद्धत शाळांनी अवलंबली आहे. कधी काळी दहावीत नापास होण्याची विद्यार्थ्यांना धास्ती होती. ती आता कालबाह्य होत असून, नववीतच विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसू लागला आहे.
एकीकडे १७ नंबर फॉर्मचा उपयोग शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी होत असताना, अनेक शाळा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी त्याचा गैरवापर करत आहेत. गेल्या वर्षी तीन हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता.
नववीचा निकाल कमी करून दहावीचा निकाल जवळपास शंभर टक्के लावायचा आणि संस्थाचालक व पालकांकडून शाबासकी मिळवायची, असे प्रकार अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक करत आहेत. अनेक शाळांमध्ये आठवी आणि नववीच्या दोन तुकड्या आहेत. परंतु, दहावीची मात्र एकच तुकडी आहे. अनेक पालकांना मुलांचे दाखले काढण्यासाठी सूचना केली जाते.
संख्या वाढतेय
एसएससी बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी जिल्ह्यातून ७ हजार २४ विद्यार्थ्यांनी सतरा नंबरचा फॉर्म भरला आहे. ही संख्या दरवर्षी वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.