नोकरदारांचा आक्रोश : कामावरून कमी केल्याच्या कामगार कार्यालयाकडे तक्रारी

नोकरदारांचा आक्रोश : कामावरून कमी केल्याच्या कामगार कार्यालयाकडे तक्रारी

पुणे - लॉकडाऊनमुळे कंपनीचे उत्पादन घटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे कारण पुढे करत कामावरून काढल्याच्या किंवा पगार कपात केल्याच्या ६८ तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत. कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सर्व तक्रारी आयटी कंपन्या, उत्पादन क्षेत्र, विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमधील नोकरदाराच्याआहेत. उद्योग-व्यवसाय बंद असल्याने मालकांनी एक तर पगार कपात केली किंवा कोणतीही सूचना न देता कामावरून काढले, अशा तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित कंपनी किंवा सेवा पुरवठादार यांच्याशी संपर्क करून कामगारांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, त्यांना पुन्हा सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तर पगार कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडे पुरेसा निधी उपलब्ध होताच पगार देऊ, असे संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने कळविले आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी दिली. 

केंद्राने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना औद्योगिक क्षेत्र, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनातील कर्मचाऱ्यांना कोणतीही कपात न करता पगार देण्याचे व कामावरून न काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही विविध कंपन्यांकडून कर्मचारी कपात, वेतन कपात, वेतन रोखून धरणे,अर्धे वेतन देणे असे निर्णय घेतले जात आहेत,त्यातून मार्ग काढण्यासाठी नोकरदार कामगार विभागाकडे भाव घेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ठिकाणी करता येणार तक्रार : 
बांधकाम मजूर, दुकाने व आयटीमधील कामगारांच्या समस्यांकरिता पनवेलकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. संबंधित कार्यालयाचा संपर्क क्रमांक ०२० - २५५४१६१७, ०२०- २५५४१६१९ हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, १९४८ अंतर्गत कामगारांच्या तक्रारी निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( दूरध्वनी क्रमांक ०२०-२७३७३०२२) यांची नियुक्ती केली आहे. येथे केवळ पगार किंवा कर्मचारी कपातीच्या तक्रारी करता येतील. 

सामाजिक संस्था, कर्मचारी संघटना, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नियुक्त अधिकारी यांच्या माध्यमातून कामगारांच्या विविध तक्रारी विभागाकडे दाखल होत आहेत. त्याची गंभीर दखल घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पगार कपात केल्याच्या जवळपास सर्वच तक्रारी सोडविल्या आहेत. तर कामावरून काढण्यात आलेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. 
विकास पनवेलकर, उपायुक्त, कामगार विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com