She demanded transparency in the Mumbai-Pune Missing Link project and questioned the government's performance over the last twelve years.
sakal
पुणे : " राज्यात मोठमोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा अजिबात विचार केलेला नाही. परिणामी, अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाल्याची स्थिती आहे. राज्यात अधिवेशन सुरू असताना अशी स्थिती निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. नेहमीच ७० वर्षांचा हिशेब मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मागील १२ वर्षातील कामाचा हिशेब कोण देणार ? ' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.