
उदगीर : उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, शहर पोलीस ठाण्याचा आवारात कावळ्यांचे मोठे अस्तित्व आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून अनेक कावळे झाडांच्या खाली मृतावस्थेत पडलेले आढळून येत आहेत. या तीन ठिकाणीच प्रशासनाला कावळे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे पशु वैद्यकीय विभाग सतर्क झाला. या कावळ्यांचे मृतदेह गोळा करण्यात आले आहेत. मंगळवारी (ता.१४) व बुधवारी (ता.१५) रोजी दिवसभर झाडाखाली जवळपास दिडशे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.