आळंदी/देहू : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७५वा वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आळंदीत रविवारी (ता. २०) माउलींच्या भेटीला येणार आहे. २८ जुलै २००८ नंतर पुन्हा एकदा दोन्ही संतांच्या अनुपम भेटीचा दुग्धशर्करा योग वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार आहे.