
पुणे : ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. समृद्ध गाव बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री यांचा असून त्यासाठी हे अभियान गावपातळीवर, नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी एक चळवळ तयार झाली पाहिजे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करा,’’ असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी केले.