

पुणे - पुणे महापालिकेत कर जास्त वसूल केला जातो आणि विकास कामे होत नाहीत या कारणाने फुरसुंगी- उरुळी देवाची ही दोन गावे वगळून त्यांची नगरपरिषद स्थापन केली आहे. या दोन गावांसाठीची पाणी पुरवठा योजना सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. ती नगरपरिषदेने ताब्यात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करावे असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नगर परिषदेला पाठवले आहे.