Loksabha 2019 : भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी - पृथ्वीराज चव्हाण

Loksabha 2019 :  भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी - पृथ्वीराज चव्हाण

पुणे - विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहिदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन करून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही? मोदींनी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी आणि प्रज्ञासिंह यांची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली. 

कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा. वंदना चव्हाण, रमेश बागवे, चेतन तुपे, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, अंकुश काकडे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. 

निवडणूक हातातून जात असल्याने भाजप धार्मिक धुव्रीकरण करून देशात तेढ निर्माण करीत आहे, अशी टीका करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""पुलवामा प्रकरणात गुप्तचर खात्याकडून आधी माहिती मिळाली होती; परंतु निष्काळजीपणा झाला, हा निष्काळजीपणा कोणी केला, की जाणीवपूर्वक तो केला गेला, याची चौकशी झाली पाहिजे.'' 

अशोक चव्हाण म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी नुसतीच कर्जमाफीची घोषणा केली. दोन वर्षांपासून ते अभ्यासच करीत आहेत. आता अभ्यास कसला करताय, तुम्ही नापास झाला आहात. संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या मोदी, शहा या हुकूमशाहांना घरी बसवून लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला साथ द्या.'' 

तर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ""जाती, धर्माच्या नावावर कोणालाही निवडून देऊ नका. या निवडणुकीतून पुन्हा हुकूमशहा निवडून येणार नाही याची काळजी घ्या. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवणाऱ्यांनी प्रत्यक्ष संसदेत हुकूमशाही सुरू केली.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com