
पुणे- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिलेल्या आदेशानुसार उरळी- फुरसुंगी येथील कचरा डेपोत मिश्र कचरा टाकू नये. तसेच कचऱयातून निर्माण होत असलेल्या लिचिटबाबत महापालिकेने तातडीने प्रक्रिया करून हडपसर परिसरात प्रदूषित होत असलेल्या जलसाठ्यांची सुरक्षितता जोपासावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगावकरांसाठी दिलासादायक बातमी! १०० बेडचे कोविड हॉस्पिटल होणार सुरु
उरळी- फुरसुंगी येथील कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये महापालिकेकडून मिश्र कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरातील जलस्त्रोत प्रदूषित होत असून नागरिकांच्या आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्याबाबत महापालिकेला पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. अन्यथा या बाबत दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेकडून होत असलेल्या दिरंबाईबाबत हडपसर, उरळी, फुरसुंगी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत अनेक स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांसह मी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनातील प्रमुख अधिकारी कोणतीही ठोस कार्यवाही न करता मोघम उत्तरे देत आहे. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे, असे चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
घनकचरा अधिनियम 2016 नुसार कचऱयाचे संकलन करतानाच त्याचे वर्गीकरण महापालिकेच्या यंत्रणेने करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच वर्गीकरण झालेला कचरा प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे. परंतु, महापालिकेची यंत्रणा सध्या मिश्र कचरा उरळी- फुरसुंगी येथील बायोमायनिंग प्लॅंटमध्ये टाकत आहे. त्याचा परिसरातील रहिवाशांना उपद्रव होत आहे. तसेच कचऱयातून निर्माण होणारे लिचिट महापालिकेने टॅंकरमध्ये भरून नजीकच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात नेऊन तेथे त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. परंतु, त्याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लिचिटमुळे उरळी- फुरसुंगी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचाही उपद्रव वाढला आहे. कोरोनासारख्या साथीच्या काळात महापालिकेचा निष्काळजीपणा परिसरातील रहिवाशांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरत आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला 19 ऑगस्ट रोजी नोटीस पाठविली आहे. त्यात मिश्र कचरा बायोमायनिंग प्लॅंटमध्ये टाकू नका, लिचिडबाबत तातडीने उपाययोजना करा, असा आदेश दिला आहे. उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. तसेच महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.
बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ
आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी परिसरातील रहिवाशांनी आंदोलन करून मागितली तर, त्यांच्या विरोधात महापालिका गुन्हे दाखल करीत आहे. हे अत्यंत चुकीचे पाऊल आहे. महापालिकेचा नाकर्तेपण लपवून ठेवण्यासाठी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नये. तसेच त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही खासदार चव्हाण यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.