

Pune News
esakal
पुणे: जागतिक बाजारपेठेत सध्या पातळ साल आणि गोड चवीच्या बीजविरहित द्राक्षांना पसंती मिळत आहे. या द्राक्षांचा बीजविरहितपणा नियंत्रित करणाऱ्या जैविक आणि जनुकीय प्रक्रियेचे कोडे शास्त्रज्ञांसाठी अद्याप पूर्णपणे सुटलेले नव्हते. हे गुपित उलगडण्यात पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना यश आले.