
आंबेठाण : धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या धरणाच्या चारही दरवाजातून १२०७ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. त्यासाठी धरणाचे दरवाजे दहा सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहे.धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने विसर्ग कमी जास्त केला जात आहे. सुरुवातीला हा विसर्ग ६०४ क्यूसेसने सुरू होता. त्यांनतर त्यात वाढ करण्यात आली आहे.
खेड,शिरूरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता.खेड) धरणात सध्या ९८.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा होता. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून १०२७ मीमी पावसाची नोंद झाली आहे
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ८.०४ टीएमसी म्हणजे ९८.५९ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा हा ७.५६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणातून विसर्ग अजून वाढवावा लागेल अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.