Pune : जनतेची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या मालकीच्या भीमाशंकर कारखान्याला बदनाम करण्याचे प्रकार थांबवावे - बाळासाहेब बेंडे

नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २७५० अधिक ३५० असा प्रति टन ३१०० रुपये दर जाहीर केला
pune
punesakal

पारगाव - भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे हित जोपासत ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे काही लोक सवंग लोकप्रियतेसाठी जनतेची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या भीमाशंकर कारखान्याला बदनाम करू पहात आहे असले प्रकार थांबवावेत असे विनंती वजा आवाहन भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.

दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर कारखाना येथे काल बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष श्री. बेंडे बोलत होते यावेळी उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, संचालक बाबासाहेब खालकर, रामचंद्र ढोबळे, आनंदराव शिंदे, पोपटराव थिटे,माजी संचालक विलास लबडे ,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते. श्री. बेंडे पुढे म्हणाले केंद्र शासनाच्या वतीने ठरवून दिलेल्या एफआरपी ची २७५० रुपये रक्कम या आधी अदा केलेली आहे. शेतकरी संघटनेने भिमाशंकर कारखान्यावर बाजारभावाबाबत आंदोलन केले होते

त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांना त्यावेळी सांगितले की एफआरपी पेक्षा जो जास्त दर द्यायचा त्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करू त्यानंतर अंतिम बाजारभावाबाबतचा निर्णय अनेक वर्षाच्या परंपरेनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे संस्थापक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जाहीर करतील असे सांगितल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले होते

pune
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २७५० अधिक ३५० असा प्रति टन ३१०० रुपये दर जाहीर केला यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत अंतिम दराचे स्वागत केले आहे भीमाशंकरने उत्तर पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेने प्रथमच ३१०० रुपये उत्तम दर दिला असतानाही काही लोक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची नाहक बदनामी करत आहे

pune
Pune Rain : पुणे शहर, जिल्ह्यात सरासरीच्या ७९ टक्केच पाऊस

मी त्यांना हात जोडून विनंती करतो की सहकार क्षेत्रातील अतिशय चांगले काम भीमाशंकर करत आहे त्याला बदनाम करू नये. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील नेहमी म्हणतात सहकारी संस्था ही काचेचे भांडे आहे. तीला जपले पाहिजे. तिला तडा जाऊ देऊ नका. सहकारी संस्थां चांगलं काम करत असताना कोणीही सहकारी क्षेत्राला बदनाम करू नये असे सांगून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मंचर येथे आले असता त्यांनी स्पष्टपणे भीमाशंकर कारखान्याचा कोठेही उल्लेख केला नसल्याबद्दल श्री. शेट्टी यांचे आभार मानले आहे.

pune
Pune News : गटारांनी पाडले पुणे महापालिकेला उघडे; अखेर सगळं पाण्यात

देवदत्त निकम हे सुद्धा गेली अनेक वर्ष संचालक आहेत दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अधिकचा दर का दिला नाही. त्यांना परिस्थितीची माहिती आहे. कारखाना दर निच्छित करताना सगळ्या गोष्टीचा विचार करूनच दर देत असतो. त्यामुळे त्यांनीहि दिशाभूल करू नये असे बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

प्रभाकर बांगर यांना झालेल्या मारहाणीचा आणि भीमाशंकर साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा काडीमात्र संबध नाही याबाबत पोलीस केस झालेली आहे त्यामुळे पोलीस तपासात खऱ्या गोष्टी पुढे येतील असे बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com