Pune : कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवरील कारवाई प्रकरणी शेतकरी संतप्त

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला अतिक्रमण विभाकडून केराची टोपली
pune farmer protest
pune farmer protest sakal

पुणे - महापालिका प्रशासनाने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर केलेल्या कारवाई विरुद्ध आयुक्तांनी कारवाई मागे घेण्याचा शब्द दिल्यानंतर आंदोलन संपण्याच्या मार्गावर होते. मात्र आयुक्तांनी आदेश देऊन ही शेतकऱ्यांची वाहने सोडण्यात आले नाहीत,

अखेर अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेले बिघडले आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत शेतकऱ्यांनी महापालिकेत धाव घेत प्रवेश द्वारा समोरच पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली." शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिकांनी अडविला तर थेट मंत्रालयात शेतमाल विक्री करण्यासाठी आणु" असा इशारा रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिला.

pune farmer protest
Mumbai Electric Water Taxi : दिवाळीत सुरु होणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी,मुंबईकर करणार स्वस्त प्रदूषण मुक्त जल प्रवास

बार्शी तालुक्यातील तावडी या गावतील शेतकरी 8 एप्रिल रोजी मांजरी भागातील ग्रामसेवक प्रशिक्षण जवळ परिसरात कांदा विक्री करीत होते. त्यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.

त्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर का आंदोलन करण्यात आले. यावेळी खोत यांनी कांदा विक्री करीत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.या मोर्चात शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कारवाई मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देत त्यांना माल विक्री करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

pune farmer protest
Mumbai Electric Water Taxi : दिवाळीत सुरु होणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी,मुंबईकर करणार स्वस्त प्रदूषण मुक्त जल प्रवास

दरम्यान, आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर ही महापालिका अतिक्रमण विभागाने शेतकऱ्यांची जप्त केलेली वाहने सोडण्यास नकार दर्शविला.

त्यामुळे खोत व शेतकरी संतप्त झाले. त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत शेतकऱ्यांनी महापालिकेत धाव घेत प्रवेशद्वारा समोरच पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांनतर खोत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले.

खोत म्हणाले, " हे राज्य सरकार लोकांचे आहे, या पद्धतीने वागणार असेल तर शेतकरी मंत्रालयात येऊन शेतमालाची विक्री केली जाईल.

आयुक्तांनी आदेश देऊन ही तो सोडला नाही. माधव जगताप ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा अडविला, त्यांची चौकशी व्हावी. माधव जगताप या अधिकाऱ्याच्या संपत्तीची सरकारने चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्याची दंड लोकवरगणी करून भरू."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com